शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन सोमवार दि. २ ओगस्ट या दिवशी उरण तालुक्यांतील एसएस पाटील स्कूल- फुंडे येथे साध्या पध्दतीने आमदार श्री. बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी कालवश झालेले गिनिज बुकमध्ये रेकॅाड ब्रेक केलेले ११ वेळा आमदार निवडून आलेले मा. गणपतराव (आबा) देशमुख यांचे निधन व कोरोना सारख्या महामारीचा सावट लक्ष्यात घेवून शासनाच्या नियमानुसार नियमांचे पाळन करून साध्या पद्धतीने उरण पनवेल मधील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
मा. आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या तत्वनिष्ठ प्रामाणिक नेत्याच्या रुपाने शे.का.पक्षाला कधीही भरून न येणा-या पोकळीच्या धक्यासह अनेक धक्कयातून मार्गक्रमण करत कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा एकदा पक्षाला संजीवनी देण्याचे काम येणा-या दिवसात करायचं आहे असे आपल्या मार्गदर्शनात जिल्हा चिटणीस व रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. आस्वाद पाटील सांगितलं. वर्धापन दिनाच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात आमदार श्री. बाळाराम पाटीलसाहेबांनी विरोधी पक्षांनी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी वेळोवेळी सातत्याने काम करत आहेत त्यातच नवी मुंबई विमान तळाच्या नामांतराच्या प्रश्नासंदर्भात आघाडी सरकारच्या धोरणानंतर पक्ष आपली भूमिका जाहिर करेल व पुढील येवू घातलेल्या महानगरपालिका आर्बन बॅंक व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी सज्ज राहून त्या जिंकून आणण्याचा मनोदय व्यक्त केले.
साधेपणात साजरा झालेल्या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस श्री. आस्वाद (पप्पूशेठ) पाटील, मा. पनवेल नगरीचे आदर्श नगराध्यक्ष श्री. जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष्या श्रीम.पारधीमॅडम, मुंबई कृषिउत्पन्न बाजार समित्तीचे संचालक श्री. राजेंद्र पाटील, पनवेल महानगरांचे विरोधी पक्षनेते श्री. प्रीतम म्हात्रे, मा. पनवेल पंचायत समिती सभापती श्री. काशिनाथ पाटील, उरण पंचायत समित्तिचे सभापती श्री. अॅड. सागर कडू, उरण तालुका चिटणीस श्री. मेघनाथ तांडेल, पनवेल तालुका चिटणीस श्री. गणेश कडू, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्रीम. अनुराधा ठोकल, उरण तालुका शे.का.प. महिला अध्यक्षा श्रीम. सिमा घरत आदी मान्यवर उपस्थित होते. वर्धापनाच्या सुरूवातीला तालुका चिटणीस श्री. मेघनाथ तांडेल यांनी स्वर्गीय मा. आमदार गणपतराव (आबा) देशमुख व कोकणामधील पुरग्रस्तांसह महाड येथे भुथ्खलणात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून प्रास्थाविक केले.शेवटी पनवेल तालुका चिटणीस भाई गणेश कडू यांनी उपस्थितीतांचे आभार मानून राष्ट्रगिताने वर्धापनाची सांगता करण्यात आली. अश्विनी निलेश धोत्रे.
Leave a Reply