जालना : येथील तीन चिमुकल्यांनी वर्षभरापासून जमा केलेले खाऊचे पैसे अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी समर्पित करुन खारीचा वाटा उचलला आहे. याबाबत प्राप्त झालेली माहिती अशी की, येथील हिंदू महासभेचे संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांचे सुपूत्र राणा क्रांतीसिंह, राणा रणविरसिंह आणि प्रज्ञादेवी या तीन बालकांनी वर्षभरापासून जमा केलेले गल्ल्यातील खाऊचे पैसे श्रीराम मंदिराच्या भव्य निर्मितीसाठी समर्पित केले.
जालना शहरातील मामा चौकातील श्रीराम मंदिर निधी संकलन समितीच्या कार्यालयातील स्वयंसेवक नितीन बागडी व किशोर दुर्गम यांच्याकडे सदरील निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी धनसिंह सूर्यवंशी, प्रितीदेवी सुर्यवंशी, हिंदू महासभेचे युवा नेतृत्व ईश्वर बिल्होरे, अशोक भगुरे, कृष्णासिंह बुंदेले, शिवमसिंह बंगरे, वेदश्री बिल्होरे यांची उपस्थिती होती. सदरील बालकांची धर्माप्रती निष्ठा व राष्ट्रप्रेम तरुणाईला प्रेरणादायी असल्याने सर्वस्तरातून या बालकांचे कौतूक करण्यात येत आहे.
Leave a Reply