उरण (संगिता पवार ) कोरोना पार्श्वभूमिवर लागोपाठ दुसर्या वर्षी उरण तालुक्यातील करंजा गावात होणारा नारळीपौर्णीमा उत्साहाचा जल्लोश उरणकरांना आनुभवता आला नाही. द्रोणागीरी हायस्कूल मधून निघणारी नारळाच्या प्रतीकृतीची मिरवणूक निघालीच नाही.परंतू नारळीपौर्णीमे निमित्त नारळाच्या प्रतीकृतीची विधिवत पूजा करुन नारळ समूद्राला आर्पण करण्यात आला.
गेल्या २० वर्षा पासुन नारळीपौर्णिमेचा उत्सव द्रोणागिरी हायस्कूल मधे साजरा केला जात आहे .विद्यार्थि पारंपारिक कोळी वेशभुषे मधे उत्सवात सामिल होउन आपली कोळी संस्क्रुतीचे दर्शन घडवितात.नंतर नारळाच्या प्रतिकृतीची मिरवणूक निघते. समुद्र किणाऱ्यावर मिरवणुक पोहचल्या नंतर विद्यार्थि,माजी विद्यार्थि पारंपारिक नृत्य सादरीकरण होते.नंतर मोठ्या भक्तिभावाने प्रतिकृतीचे पुजन होऊन .नारळ नौकेतुन समुद्राला अर्पण केला जातो.
परंतु कोरोना महामारीमुळे यावर्षी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सालाबादप्रमाणे वृक्षांना महिला व विद्यार्थीनींनी राखी बांधली.नंतर इतर सर्व कार्यक्रम रद्द करुन नारळाच्या प्रतीमेचे पूजन करुन नारळ मोटरगाडीतून समूद्रावर नेला.व तेथून होडीमध्ये खोल समूद्रात नेवून त्याचे विसर्जन केल.
.याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा ,करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी ,विद्यालयाचे व्हा.चेअरमन के. एल. कोळी, माजी चेअरमन शिवदास नाखवा, माजी उपसरपंच प्रदीप नाखवा ,मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक ए टी पाटील सर, इंग्रजी माध्यमाच्या प्रिन्सिपल सौ.प्रभु म्यडम ,सोसायटीचे सदस्य,स्कुल कमिटीचे सदस्य,सदस्या,ग्रामस्थ व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
Leave a Reply