सातारा (प्रतिनिधी विदया निकाळजे) : सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून वेगाने लसीकरण मोहीम चालू आहे.त्यामुळे जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून,पश्चिम महाराष्ट्रात ,महाबळेश्वर तालुका पहिला तालुका ठरला आहे.जिल्ह्यात१८ वर्षांपुढील लोकसंख्या २१ लाख असून आतापर्यंत १९ लाख ३० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने जिल्ह्याचे एकूण सरासरी९०टक्के लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यात १ जानेवारी पासून लसीकरण मोहीम सुरू झाली.सुरुवातीच्या टप्प्यात जिल्ह्याला लशींचे डोस ज्यादा आल्याने लसीकरण वेगाने सुरू होते मात्र ,एप्रिल ते जून महिन्यापर्यंत लसीकरण मोहीम लशींअभावी मंदावल्याचे दिसून आले मात्र ,जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात लसीकरणाची संख्या वाढल्याचे दिसून आले.लशींची संख्या जादा उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात तब्बल ६०हजार लसीकरणाचीही नोंद दोन आठवड्यांपूर्वी झाली आहे. याचबरोबर लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली आहे.त्यामुळे सातारा जिल्हा लसीकरणाच्या आकडेवारीत पश्चिम महाराष्ट्रात तिसरा क्रमांकावर आहे.राज्यभरात महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याचा विचार करता सातारा जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागत आहे जिल्हा प्रशासनाने लसींच्या बाबतीत पाठपुरावा केल्याने लशींचे डोसही जादा मिळत असल्याचे दिसून येत आहे या लसीकरणात सातारा जिल्हा अव्वल ठरत असून, लसीकरणात आरोग्य सेविका आशा सेविका यांचे योगदान मोठे आहे.
Leave a Reply