नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान मी सावरकर नाही, मी गांधी आहे. मी माफी मागणार नाही अशा स्वरूपाचे विधान केलं होतं. आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात आला. ठीक ठिकाणी आंदोलने करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच आपल्याच बघायला मिळालं. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गट असल्याने त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी अशी भूमिका भाजपासह शिवसेना शिंदे गटाकडून केली जात होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहीर आपली भूमिका स्पष्ट केली होती.

मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना इशारा देत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दलचा अपमान सहन केला जाणार नाही आपण लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आलो आहोत असं म्हणत भूमिका स्पष्ट केली होती. उद्धव ठाकरे यांच्या याच भूमिकेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी पत्रकार परिषद घेत बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल बोलण्यावरून मनीशंकर अय्यर यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा फोटो दाखवत उद्धव ठाकरे यांना तुम्ही राहुल गांधी यांच्या कानशिलात लगावणार का असा सवाल केला होता. याच दरम्यान मुख्यमंत्री यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वीर सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचे जाहीर करत उद्धव ठाकरे यांची अडचण वाढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भाजपने आणि आरएसएसने विरोध केला होता, त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि हे काय आम्हाला सांगणार स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते भाजपचा हा ढोंगीपणा असल्याचं टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी त्यांच्यातील वाचू का हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरही संजय राऊत यांनी जोरदार टीका केली असून थेट गुलामीच काढली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना एक कागद दाखवून वाचू का असे म्हणतात त्यावरूनच त्यांची गुलामी कळते असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे.





















